नटसम्राट बालगंधर्व यांच्या जयंती निमित्त ओंकार बेडेकर गणपती मंदिर आणि म. ए. सो. रसिक परिवार आयोजित
Sunday, June 26, 2011
बालगंधर्व : गंधर्व युगाचा सुरेल आविष्कार
Friday, June 24, 2011
Sumiran: Concert by Pt Aravind Thatte (Harmonium Solo)
Sunday, June 12, 2011
पं. श्रीकांत देशपांडे यांचा स्मृत्यर्थ संगीत समारोह
पं. श्रीकांत देशपांडे यांचा स्मृत्यर्थ संगीत समारोह
Friday, June 10, 2011
जोत्स्ना भोळे स्वरोत्सव
Thursday, May 26, 2011
Riyaz Workshop by Pt Suresh Talwalkar
Riyaz workshop by Pandit Suresh Talwalkar.
Friday, May 6, 2011
'काव्येर कथा - कवितेची गोष्ट'
२१वा वासंतिक संगीत नाट्य महोत्सव २०११
भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे आयोजित
Tuesday, May 3, 2011
ज्येष्ठ कवी व गीतकार जगदीश खेबुडकर यांचे निधन
काही दिवसांपूर्वी श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागल्यानं जगदीश खेबुडकर यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सुरुवातीचे काही दिवस ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत होते. परंतु, नंतर त्यांची तब्येत अचानक खालावली गेली आणि किडनी निकामी झाल्यानं आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यानं मराठी सिनेजगतात शोककळा पसरली आहे.
जगदीश खेबुडकर यांचा जन्म १० मे १९३२ सालचा. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली आणि इथेच त्यांचं कार्यक्षेत्र ठरून गेलं. १९५६ रोजी त्यांचेपहिले गीत आकाशवाणीवर प्रसारित झालं, तर १९६० रोजी त्यांचं पहिले चित्रगीत प्रेक्षकांसमोर आलं. त्यानंतर या प्रतिभासंपन्न कवीनं मागे वळून पाहिलं नाही. उत्कट भावभावनांचा सौंदर्यपूर्ण आविष्कार त्यांच्या लेखणीतून साकारत गेला आणि त्यांनी मराठी गीत-संगीतप्रेमींना मोहून टाकलं. आकाशी झेप घे रे पाखरा, पिकल्या पानांचा देठ की हो हिरवा, मला हो म्हणतात लवंगी मिरची, विठुमाऊली तू माऊली जगाची, ऐरणीच्या देवा तुला, कसं काय पाटील बरं हाय का, अष्टविनायका तुझा महिमा कसा, तुम्हावर केली मी मर्जी बहाल यासारखी बहुरंगी, बहुढंगी गाणी त्यांनी लिहिली आणि मराठी रसिकांना अक्षरशः वेड लावलं. पिंजरा चित्रपटातल्या प्रत्येक लावणीतला प्रत्येक शब्द त्यांनी ज्या ताकदीनं लिहिला त्याला तोड नव्हती.
आपल्या ५०-५२ वर्षांच्या कारकीर्दीत साडेतीन हजार कविता , पावणेतीन हजारचित्रगीते , २५ पटकथा , संवाद , ५० लघुकथा , पाच नाटके , चार दूरदर्शन मालिका, चार टेलिफिल्म , पाच मालिका गीते जगदीश खेबुडकरांच्या नावावर जमा आहेत. जुन्या काळातील अनेक मातब्बर गायक-संगीतकारांसोबत त्यांनी जितक्या सहजतेनं काम केलं, तितक्याच सोपेपणानं त्यांनी नव्या पिढीतल्या गायक-संगीतकारांशीही जुळवून घेतलं. अलिकडच्या काळात अजय-अतुलनं संगीतबद्ध केलेलं मोरया-मोरया हे गाणंही खेबुडकरांचंच आहे. किंबहुना, अजय-अतुलच्या संगीतावर खेबुडकरांनी या गाण्याचे शब्द लिहिले आहेत. यातून त्यांचं सामर्थ्य सहज लक्षात येतं.
सिनेसंगीतविश्वाला दिलेल्या योगदानाबद्दल जगदीश खेबुडकर यांना व्ही. शांताराम स्मृती जीवनगौरव पुरस्कार, ‘ मृत्युंजय ’ कार शिवाजी सावंत पुरस्कार, बालगंधर्व स्मारक समिताचा बालगंधर्व पुरस्कार यासारखे अनेक सन्मान मिळाले होते.
मी साहित्यिक झालो, जन्माचं सार्थक झालं, अशा भावना ठाण्याच्या साहित्य संमेलनात व्यक्त करणा-या जगदीश खेबुडकरांनी आज ईहलोकीचा निरोप घेतला. ते आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांची गाणी आपल्या ओठांवर कायमच येतील, आकाशवाणीवर त्यांचं गाणं वाजलं नाही, असा एकही दिवस जाणार नाही, अशा भावना व्यक्त करत सिने-साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Sunday, May 1, 2011
Friday, April 29, 2011
उस्ताद अल्लारखा जयंती संगीत समारोह
'सा' व 'नी' प्रस्तुत
Saturday, April 23, 2011
Victoria Aja - Piano Recital
Saturday 23rd April at 7 pm, Mazda Hall
.jpg)
Friday, April 22, 2011
स्वरभास्कर संगीत महोत्सव २०११
Great disciple of Pt. Bhimsenji Joshi, Pt. Madhav Gudi passed away this morning

Friday, April 15, 2011
CONCERT: Shri Milind Tulankar
Indian Council for Cultural Relations and Symbiosis International Cultural Center present